Skip to main content

Posts

विजयोन्मुख राजाची लक्षणे : शुक्रनितीसार, शिवभारत आणि चिटणीस बखर

इतिहासाच्या बखरी, पोवाडे, काव्ये अशी साधने पुर्णपणे त्याज्यंच मानली पाहिजेत, इतिहासात त्यांचे स्थान शून्यंच, असा एक आढ्यतेखोर परंतु अर्धवट अभ्यासावर आधारभुत मतप्रवाह दिसतो. सहज वाचताना, तीन वेगवेगळ्या कालखंडांत लिहिलेल्या साहित्यांत हे सारख्या स्वरुपाचे मिळालेले आधार पहा.. शुक्रनीती हा ग्रंथ महाभारतकाळात लिहिला असे मानले जाते. त्यातील चौथ्या अध्यायातील एक श्लोक असा, यो वै सुपुष्टसंभारस्तथा षड्गुणमंत्रवित । बह्वसंयुतो राजा योद्धुमिच्छेत् स एव हि ।। अन्यथा दुःखमाप्नोति स्वराज्याद्भ्रश्येति च ।। २१९ ।। इथे, ज्या राजाजवळ विपुल सामग्री आहे, जो षड्गुण संपन्न आहे व ज्याचेपाशीं शस्त्रात्रांचा भरपूर पुरवठा आहे, त्यानें युद्ध करण्याची इच्छा बाळगावी, असे म्हटले आहे. संधी (बलिष्ठ शत्रुशी स्नेह), विग्रह(युद्ध), यान (शत्रुवर स्वारी करुन नाश) , आसन(स्वरक्षण करुन शत्रुचा नाश), आश्रय (स्वबल अल्प असता, ज्याचे योगाने शक्ती प्राप्त होते असा), आणि द्वैधीभाव (आपले सैन्य अनेक ठिकाणी विभागून ठेवणे) हे ते षड्गुण होत. आता जो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतंच लिहिला गेला अशा समकालीन 'शिवभारत...

शंभूरायांचा रायगड

सह्याद्रीच्या भाळीचा साज म्हणजे रायगड...दुर्गदुर्गेश्वर रायगड ! रायरीच्या डोंगरावरील या किल्ल्याचा इतिहास थेट बाराव्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. तेव्हापासून इंग्रजी राजवटीपर्यंत अनेक कर्तृत्ववान राज्यकर्त्यांनी रायगडावर आपली सत्ता गाजवली ; पण आपल्याला ‘रायगड’ हे नाव उच्चारले,म्हणजे आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड..शिवरायांचा रायगड ! शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावर छत्रपतीपद भुषविले शंभूरायांनी, मात्र दुर्दैव महाराष्ट्राचे, शंभुराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील दफ्तरखाना भस्मसात झाला आणि शिवशंभूछत्रपती व रायगड याविषयीची अत्यंत त्रोटक माहिती आपल्याकडे उपलब्ध राहिली. आज रायगडावर हिंडताना संभाजीराजांसंबंधी काही स्मरण होईल असं काहीही नाही, असं आदरणीय प्र.के. घाणेकर गुरुजी ‘छत्रपती संभाजी स्मारक-ग्रंथात’ खेदाने नमूद करतात (पृ. ३४९). तरीही आपल्याकडील उपलब्ध साधनांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..शंभूरायांचा रायगड !   १७ अॉगस्ट १६६६, औरंगजेबासारख्या कावेबाज कोल्ह्याच्या जाळ्यातून सह्याद्रीचा सिंह आपल्या पुत्रासह अगदी अलगद सुटून बाहेर आला. मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीतून धडा घेत आणि...

दुर्गभ्रमंतीसाठी बाळगावयाची प्रथमोपचार पेटी

“अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री…!” विराट सह्याद्रीचं श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं हे तितकंच अचाट वर्णन ! सह्याद्रीचा भुगोल राकट आहे,सह्याद्रीचा इतिहास अफाट आहे. हजारएक वर्षांपर्यंत सह्याद्रीचा इतिहास तर अगदी सहज पाठी जातो. इथले ताशीव कडे, आखीव लेणी आणि भरीव किल्ले इतिहासवेड्यांना- दुर्गवेड्यांना सतत साद घालत असतात..उन्हाळी,हिवाळी,पावसाळी सहली आखत तिनही ऋतूंत भटकंतीसाठी भटक्यांच्या टोळ्या सदासर्वदा तयार असतात. अपुऱ्या सोयीसुविधा,अज्ञान,निष्काळजीपणा,समजुती-गैरसमजुती,अतिउत्साहातील वेडे धाडस अशा काही कारणांमुळे या भटक्यांना विविध अपघातांना,आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अशा समस्या उद्भवल्याच,तर त्यावर प्रथमोपचार करण्यासाठी,त्या समस्यांमुळे होणाऱ्या पुढील परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी दुर्गभ्रमंतीवेळी भटक्यांनी आपल्यासोबत काय साहित्य प्रथमोपचारासाठी सोबत बाळगावं, अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी,याबद्दल थोडक्यात माहिती ...

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय...

इतिहास - अर्थ,व्याप्ती आणि भुमिका (ले. रियासतकार गो. स. सरदेसाई)

‘लोकशिक्षण’ मासिकात डिसेंबर १९३२ मध्ये रियासतकार ‘गो. स. सरदेसाई’ यांनी लिहिलेला हा लेख,’मराठी रियासत’ च्या नवीन आवृत्त्तीत पुनश्च दिला आहे.सुमारे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांपुर्वी रियासतकारांनी मांडलेले हे विचार पाहिले,तर हे सरस्वतीपुत्र खरंच आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करत होते,हे पटल्याशिवाय रहात नाही.  त्या लेखाचा हा काही भाग-   राष्ट्रीय इतिहास : अर्थ व्यात्प्ती आणि भुमिका History is always growing and for this reason it always needs to be rewritten. History is a progressive science, not merely because new facts are constantly being discovered , not merely because the changes in the world give to old facts a new significance, but also because every truly penetrating and original mind sees in the old facts something which had not been seen before. (James Bryce, British historian) …. इतिहास स्थिर नाही व निश्चितही नाही,ही गोष्ट दुसऱ्या एका दृष्टीनेही पटणारी आहे.एकाच व्यक्तीसंबंधाने इतिहासाचा अभिप्राय कसा वारंवार बदलत जातो याची उदाहरणे व्यवहारात आपल्या दृष्टीने कितीतरी ...

राजा शंभूछत्रपती

आपल्या पराक्रमाने सर्व दिशा उजळून टाकणाऱ्या स्फुरोत्प्रतापोज्ज्वलदिग्विभागः शंभूराजांना आदरपुर्वक मुजरा.....      राजा शंभूछत्रपती   महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश!! राकट देश,कणखर देश..या दगडांच्या देशात जगन्मातेने दोन उत्तुंग लेणी कोरली.पहिलं लेणं म्हणजे विधात्याने सह्याद्रीच्या कळसावर चढवलेला राजमुकूटच-राजा शिवछत्रपती!!आणि दुसरं लेणं म्हणजे या राजमुकूटावर शोभून दिसणारा हि-यांचा शिरपेचंच जणू,हिऱ्यांइतकाच तेजस्वी आणि कणखर - राजा शंभूछत्रपती!!   स्वराज्य- स्वभिमानाने चेतवलेलं पवित्र अग्निकुंड!! जिजाऊ आणि शहाजीराजांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत हे अग्निकुंड मांडलं.. शिवरायांनी पाहता पाहता हा वन्ही चेतवला,महाराष्ट्रधर्म जागवला;महाराष्ट्राच्या कणाकणांतून स्वाभिमानी उर्जेचा कल्लोळ जागवला.या पवित्र यज्ञाची धुरा शंभूराजांनी सांभाळली;प्रसंगी त्यात स्वतःची आहुती दिली;पण हे अग्निकुंड तसंच धगधगतं ठेवलं.   संभाजी,सहस्त्रसुर्यांच्या दाहकतेलाही नमवतील,अशी ही तीन तेजस्वी ओजस्वी अक्षरं!संभाजी म्हणजे धगधगता स्वाभिमान,संभाजी म्हणजे शौर्य,संभाजी म्हणजे धैर्य,संभाजी...

साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज

छत्रपती संभाजी महाराज,हा तमाम मराठी बांधवांच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे.स्वराज्याच्या दुसऱ्या  छत्रपतीचं चरित्र तेजस्वी तरीही दुर्दैवीच म्हणावं लागेल. शंभूराजांच्या चरित्रात नाट्यमय घटना आहेत,हेवेदावे आहेत,बेफिकीर शौर्याचे लखलखते कल्लोळ आहेत,सुखाच्या श्रावणसरी आहेत आणि दुःखाचे काळेकुट्ट मळभही आहे.अशा चरित्राने नाटककार,कादंबरीकारांना भुरळ घातली नसती,तर नवलंच ! इतकेच कशाला मी स्वतः इतिहासाकडे वळलो,तो लहान वयातच शिवाजी सावंताचे 'छावा' वाचून जे प्रश्न पडले,त्याची उत्तरे शोधण्याच्या नादातुनंच ! बखरकारांपासून ते आजकालच्या स्वयंघोषित इतिहासकारांपर्यंत आजवर 'संभाजी' या ऐतिहासिक पात्रावर पुष्कळ लोकांनी लिहिले आहे.ज्याने-त्याने आपापल्या कुवतीनुसार,अपेक्षांनुसार स्वतःला हवे तसे संभाजीराजे रंगवले. यातून संभाजीराजांची तीन प्रकारची व्यक्तीमत्वे प्रामुख्याने रंगवलेली दिसतील.एक, जुन्या बखरकारांनी रंगवलेले हट्टी,दुराग्रही,कोपिष्ट,व्यसनी,बदफैली,नाकर्ते संभाजीराजे;अखेरच्या क्षणी फिल्मी स्टाईलने त्यांना आपली चुक उमगली आणि देशधर्मासाठी अजोड असे बलिदान त्यांनी दिले.गेल्या कित्येक वर्ष...