Skip to main content

Posts

Showing posts from 2016

राजा शंभूछत्रपती

आपल्या पराक्रमाने सर्व दिशा उजळून टाकणाऱ्या स्फुरोत्प्रतापोज्ज्वलदिग्विभागः शंभूराजांना आदरपुर्वक मुजरा.....      राजा शंभूछत्रपती   महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश!! राकट देश,कणखर देश..या दगडांच्या देशात जगन्मातेने दोन उत्तुंग लेणी कोरली.पहिलं लेणं म्हणजे विधात्याने सह्याद्रीच्या कळसावर चढवलेला राजमुकूटच-राजा शिवछत्रपती!!आणि दुसरं लेणं म्हणजे या राजमुकूटावर शोभून दिसणारा हि-यांचा शिरपेचंच जणू,हिऱ्यांइतकाच तेजस्वी आणि कणखर - राजा शंभूछत्रपती!!   स्वराज्य- स्वभिमानाने चेतवलेलं पवित्र अग्निकुंड!! जिजाऊ आणि शहाजीराजांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत हे अग्निकुंड मांडलं.. शिवरायांनी पाहता पाहता हा वन्ही चेतवला,महाराष्ट्रधर्म जागवला;महाराष्ट्राच्या कणाकणांतून स्वाभिमानी उर्जेचा कल्लोळ जागवला.या पवित्र यज्ञाची धुरा शंभूराजांनी सांभाळली;प्रसंगी त्यात स्वतःची आहुती दिली;पण हे अग्निकुंड तसंच धगधगतं ठेवलं.   संभाजी,सहस्त्रसुर्यांच्या दाहकतेलाही नमवतील,अशी ही तीन तेजस्वी ओजस्वी अक्षरं!संभाजी म्हणजे धगधगता स्वाभिमान,संभाजी म्हणजे शौर्य,संभाजी म्हणजे धैर्य,संभाजी म्हणजे रूद्र,साक्षात शंकर!!

साहित्यातले संभाजी : समज आणि गैरसमज

छत्रपती संभाजी महाराज,हा तमाम मराठी बांधवांच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे.स्वराज्याच्या दुसऱ्या  छत्रपतीचं चरित्र तेजस्वी तरीही दुर्दैवीच म्हणावं लागेल. शंभूराजांच्या चरित्रात नाट्यमय घटना आहेत,हेवेदावे आहेत,बेफिकीर शौर्याचे लखलखते कल्लोळ आहेत,सुखाच्या श्रावणसरी आहेत आणि दुःखाचे काळेकुट्ट मळभही आहे.अशा चरित्राने नाटककार,कादंबरीकारांना भुरळ घातली नसती,तर नवलंच ! इतकेच कशाला मी स्वतः इतिहासाकडे वळलो,तो लहान वयातच शिवाजी सावंताचे 'छावा' वाचून जे प्रश्न पडले,त्याची उत्तरे शोधण्याच्या नादातुनंच ! बखरकारांपासून ते आजकालच्या स्वयंघोषित इतिहासकारांपर्यंत आजवर 'संभाजी' या ऐतिहासिक पात्रावर पुष्कळ लोकांनी लिहिले आहे.ज्याने-त्याने आपापल्या कुवतीनुसार,अपेक्षांनुसार स्वतःला हवे तसे संभाजीराजे रंगवले. यातून संभाजीराजांची तीन प्रकारची व्यक्तीमत्वे प्रामुख्याने रंगवलेली दिसतील.एक, जुन्या बखरकारांनी रंगवलेले हट्टी,दुराग्रही,कोपिष्ट,व्यसनी,बदफैली,नाकर्ते संभाजीराजे;अखेरच्या क्षणी फिल्मी स्टाईलने त्यांना आपली चुक उमगली आणि देशधर्मासाठी अजोड असे बलिदान त्यांनी दिले.गेल्या कित्येक वर्ष

मध्यान्हीचा सुर्यास्त : सत्य आणि शोकांतिका

३ एप्रिल १६८०,चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२,सहस्त्रसूर्यांच्या तेजालाही झाकोळून टाकणारा शिवसूर्य भर मध्यान्ही अस्ताला गेला. महाराजांचा असा अकाली ध्यानीमनी नसताना झालेला मृत्यू मनात शंका उत्पन्न करू शकतो.त्यातुनंच काही बखरी आणि इतर पत्रांतून असा संशय व्यक्त केलेलाही दिसतो.कांदबरीकार,कथाकार,नाटककार यांना त्यात आपली कथा रंगवण्यास साजेसे नाट्य दिसते. महाराजांचा मृत्यू कसा झाला,हे आता उपलब्ध कागदपत्रांवरून काहीसे स्पष्ट आहे.महाराजांच्या मृत्यूबद्दल काही समकालीन व उत्तरकालीन नोंदी पुढीलप्रमाणे देता येतील- १.सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा मुतालिक (सल्लागार) होता.शिवछत्रपतींचे कनिष्ठ पुत्रराजाराम महाराजांच्या आज्ञेवरून त्याने जिंजी येथे थोरल्या महाराजांचे चरित्र लिहिले होते. त्यात म्हटले आहे,    "मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले..." २.जेधे शकावली शिवछत्रपतींचे सरदार कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशज