Skip to main content

Posts

Showing posts from 2020

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज

Chhatrapati Shivaji and his Maharashtra-dharma (The religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj)

It is a rule of Historiography, that to draw any inference about a historical figure, one must consider at least three different types of contemporary facts – first, words and deeds of that person himself or his close associates; second, views of his enemies and third, convictions of any third person or neutral authority! Now a days the religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj is often debated, sometimes for political or other interests by different people, parties and institutions. However, by studying ample of available evidences in aforementioned fashion, a conclusion can easily be made. The very first thing that we should bear in our mind is that we are discussing an era of strong religious beliefs. Customs and living of people were greatly influenced by sayings of religious scriptures. For almost three hundred years before Chhatrapati Shivaji, India was ruled by Muslim invaders, majority of them proved to be fanatics. For every new territory conquered, Hindus we

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

औरंगजेबाचे 'अधर्मी' शासन

शीर्षकावरून या लेखाचा विषय काय आहे, हे एव्हाना लक्षात आलंच असेल. औरंगजेबाच्या धार्मिक वेडाची अनेक उदाहरणे आहेत. अखंड हिंदुस्तान इस्लामच्या झेंड्याखाली रगडावा ही औरंगजेबाची जबर महत्वकांक्षा होती. तरी औरंगजेबाचं प्रशासन मात्र 'सेक्युलर' होतं; शेती, व्यापार कसे उत्तम चालले होते असं काहींना वाटतं; पण आजवर वाचनात आलेली काहीही उदाहरणं इथे एकत्र देत आहे. ही उदाहरणं मुद्दाम शोधलेली नाहीत, सहज वाचनात आली आहेत; शोधायला गेलो तर पुष्कळ उदाहरणं सापडतील याची मला खात्री आहे ! औरंगजेबाने रसिकदास करोडी यास दिलेले एक फर्मान उपलब्ध आहे. त्यावरून आपल्या मुलुखातील शेतीचे उत्पन्न आणि परिणामी त्यापाठचा महसूल वाढावा, यासाठी औरंगजेब किती दक्ष होता, हे दिसून येते. मात्र त्यासोबत औरंगजेबाला रयतेबद्दल कणव होती का ? औरंगजेबाने शाहजहानची नाणी बदलून, 'आलमगीरी नाणी' पाडली. कर भरताना जनतेकडून नव्या नाण्यांच्या रुपातंच कर घ्यावा, जुनी नाणी असल्यास कर भरणाऱ्याकडूनच त्याचा भुर्दंड (सिक्का अबवाब/ सर्फ-ए-सिक्का) घेऊन नाणी बदलावीत असा हुकूमऔरंगजेबाने काढला होता. केवळ चौधरी, कानुगो, मुकादम, पतवारी यां

'तान्हाजी'च्या निमित्ताने...

'गड आला पण सिंह गेला' ही तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मराठी माणसाला अत्यंत जिव्हाळ्याची वाटतेच; पण शाहीरांनीही तानाजीरावांच्या शौर्याचे, हौतात्म्याचे जे पोवाडे गायले, त्याचे नाद अखिल हिंदुस्थानात निनादत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या हा विषय अधिक चर्चेत आहे. काय खरे काय खोटे अशी पृच्छा सतत अनेकजण करत आहेत. इंटरनेटवर, समाजमाध्यमांवरही याविषयावर फारशी माहितीही उपलब्ध नाही. मुळ इतिहास व चित्रपट यांच्याशी निगडीत जे विविध प्रश्न विचारले जातात, त्या सर्वांची उत्तरे इथे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांच्या इतिहासावर अशाप्रकारचा बिग बजेट चित्रपट बनावा, ही गोष्टच मुळात सुखावणारी आहे. वेगवान कथानक, स्पेशल इफेक्ट्स यामुळे चित्रपट खरंच नेत्रदिपक झाला आहे. तेव्हा आधी चित्रपट बघा, मगच या लेखाकडे वळा ! इतिहासातील एखादी घटना खरी किंवा खोटी कशी ठरवली जाते ? भुतकाळात काही शतके आधी घडून गेलेली गोष्ट जशीच्या तशी जाणून घेणे जवळजवळ अशक्य आहे. पण मग आपण आपल्याला वाटतील तसे तर्क करावेत, मनाला वाटतील तसे कल्पनेचे इमले बांधावेत असा नस