Skip to main content

Posts

Showing posts from 2017

दुर्गभ्रमंतीसाठी बाळगावयाची प्रथमोपचार पेटी

“अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री…!” विराट सह्याद्रीचं श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं हे तितकंच अचाट वर्णन ! सह्याद्रीचा भुगोल राकट आहे,सह्याद्रीचा इतिहास अफाट आहे. हजारएक वर्षांपर्यंत सह्याद्रीचा इतिहास तर अगदी सहज पाठी जातो. इथले ताशीव कडे, आखीव लेणी आणि भरीव किल्ले इतिहासवेड्यांना- दुर्गवेड्यांना सतत साद घालत असतात..उन्हाळी,हिवाळी,पावसाळी सहली आखत तिनही ऋतूंत भटकंतीसाठी भटक्यांच्या टोळ्या सदासर्वदा तयार असतात. अपुऱ्या सोयीसुविधा,अज्ञान,निष्काळजीपणा,समजुती-गैरसमजुती,अतिउत्साहातील वेडे धाडस अशा काही कारणांमुळे या भटक्यांना विविध अपघातांना,आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अशा समस्या उद्भवल्याच,तर त्यावर प्रथमोपचार करण्यासाठी,त्या समस्यांमुळे होणाऱ्या पुढील परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी दुर्गभ्रमंतीवेळी भटक्यांनी आपल्यासोबत काय साहित्य प्रथमोपचारासाठी सोबत बाळगावं, अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी,याबद्दल थोडक्यात माहिती

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

इतिहास - अर्थ,व्याप्ती आणि भुमिका (ले. रियासतकार गो. स. सरदेसाई)

‘लोकशिक्षण’ मासिकात डिसेंबर १९३२ मध्ये रियासतकार ‘गो. स. सरदेसाई’ यांनी लिहिलेला हा लेख,’मराठी रियासत’ च्या नवीन आवृत्त्तीत पुनश्च दिला आहे.सुमारे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांपुर्वी रियासतकारांनी मांडलेले हे विचार पाहिले,तर हे सरस्वतीपुत्र खरंच आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करत होते,हे पटल्याशिवाय रहात नाही.  त्या लेखाचा हा काही भाग-   राष्ट्रीय इतिहास : अर्थ व्यात्प्ती आणि भुमिका History is always growing and for this reason it always needs to be rewritten. History is a progressive science, not merely because new facts are constantly being discovered , not merely because the changes in the world give to old facts a new significance, but also because every truly penetrating and original mind sees in the old facts something which had not been seen before. (James Bryce, British historian) …. इतिहास स्थिर नाही व निश्चितही नाही,ही गोष्ट दुसऱ्या एका दृष्टीनेही पटणारी आहे.एकाच व्यक्तीसंबंधाने इतिहासाचा अभिप्राय कसा वारंवार बदलत जातो याची उदाहरणे व्यवहारात आपल्या दृष्टीने कितीतरी येतात.कित