Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

मध्ययुगीन जातीव्यवस्था - एक दृष्टिक्षेप

गतकालीन इतिहासाचे अवलोकन करीत असताना, काळाच्या मर्यादा जाणणे फार आवश्यक असते. वास्तविक इतिहासातील कोणत्याही घटनेचे जसेच्या तसे संपूर्ण आकलन करून घेणे अशक्य आहे. आपण केवळ उपलब्ध संदर्भ-पुराव्यांच्या आधारे जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथीनिष्ठ धार्मिक समजूती यांचे मध्ययुगात वर्चस्व होते, हे खरेच ! केंद्रीय राजसत्ता पेशव्यांच्या मुठीत आल्यावर राजकीय व्यवस्थेत ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूपश्चात या व्यवस्थेत जी अनागोंदी माजली तिची वर्णने क्लेशदायकंच आहेत. समाज म्हटला, म्हणजे असे दोष प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात आढळतील; पण कुठल्याही बाबतीत असे थेट काळे-पांढरे पट्टे ओढता येत नाहीत; हेच दाखवण्यासाठी हा प्रयत्न. मध्ययुगात वर्णभेद व त्या त्या वर्णांची कर्तव्ये याविषयीची समजुत दृढ होती. या कर्तव्यांचे पालन म्हणजेच धर्मपालन असे समजले जात असे. याबद्दल एक उदाहरण देतो. छत्रपती संभाजी महाराज आपल्या 'बुधभुषणम्'या ग्रंथात शिवछत्रपतींचा गौरव करताना म्हणतात - येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गते गोपलेखिलवर्णधर्

महाराष्ट्रधर्माच्या अस्मितेची मूर्ती - श्रीगणेश

गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे निधीनां त्वा निधिपति हवामहे वसो मम । आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम ।। यजुर्वेदाच्या तेविसाव्या अध्यायात राष्ट्र आणि प्रजा या संकल्पनांचे विवरण आले आहे. त्यापैकी एकोणिसाव्या श्लोकात 'हे गणांच्या नायका गणपती, सर्व प्रिय पदार्थांचा प्रियपति, अर्थादी ऐश्वर्याचा निधिपती मी तुझा स्विकार करतो. मी (प्रकृती) तुला प्राप्त होते आणि समस्त प्रजेला धारण करणाऱ्या मला (प्रकृती) तू प्राप्त होवो', अशी परमेश्वराची प्रार्थना केली आहे ! वास्तविक उपरोक्त मंत्रात 'गणपती' या देवतेचा स्त्रीगणांचा अधिपती, पालक अशा अर्थाने उल्लेख आहे; किंवा प्रियपती, निधीपती हे उल्लेख 'वसू'चेही मानले जातात. या मंत्रासहीत इतर एकोणीस मंत्र ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात आहेत. वास्तविक याही मंत्रांची देवता ही 'बृहस्पती'असून, वर्तमानकाळात ज्या स्वरूपात गणपतीची पूजा केली जाते, तो गणपती वेदात अभिप्रेत होता का, यावर अभ्यासक शंका घेतात. वेदांचा काळ अभ्यासकांच्या मते इसवी सन पुर्व १५००वर्षे इतका पाठी नेला जाऊ शकतो. आजच्या काळाशी मिळत्याजुळत्या गण