Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

स्वराज्याचा श्रीगणेशा

स्वराज्य…महाराष्ट्रधर्मोदयासमयी जिजाऊसाहेब व शाहजीराजांस पडलेले गोमटे स्वप्न ! स्वराज्य…ज्याला मुर्त स्वरुप दिले क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपतींनी ! माता-पित्यांच्या प्रेरणेने स्वराज्याची एक-एक विट रचण्यास सुरुवात करणारा एक किशोरवयीन मुलगा ते दिडशे-पावणेदोशे वर्षे स्थिर झालेल्या आदिलशाही सत्तेविरोधात प्रचंड आत्मविश्वासाने शड्डू ठोकून त्यांना समर्थपणे चीत करणारा तरुण, हा शिवछत्रपतींचा प्रवास चित्तथारक आणि प्रेरणादायी आहे. इ. स. १६४२ मध्ये दादाजी कोंडदेवांसोबत शिवाजीमहाराज आणि जिजाऊसाहेब यांना शाहजीराजांनी बंगळूराहून पुण्याकडे पाठवून दिले. तिथून शिवाजीराजे, जिजाऊसाहेब आणि दादाजी कोंडदेव ही त्रयी पुण्याकडील जाहगीरीचा कारभार पाहत होती. याकाळात आपल्या अखत्यारीतला प्रदेश किल्ल्यांच्या साथीने महाराज अधिकाअधिक बळकट करत गेले. बारा मावळांतील देशमुख देशपांड्यांस ते राजी झाल्यास सोबत घेऊन, वाटेत आडवे आल्यास त्यांस दस्त करुन संचणी करत चालले. दरम्यान आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, हे बारा मावळातील लोकांत राजांनी पक्के ठसवले. ही वाटचाल सुरु असतानांच इ. स. १६४८ च्या उत्तरार्धात अठरा वर्षे वयाच

मल्हारराव होळकर आणि नजीबउद्दौलाह

उत्तरेत वारंवार अहमदशाह अब्दालीच्या आडून मराठ्यांस शह देणाऱ्या, अब्दालीच्या धार्मिक भावनेस हात घालून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या नजीबास मराठ्यांनीच एका कागदात 'खेळ्या' असे म्हटले आहे. पानिपतावरील रणसंग्रामास जबाबदार शकूनी खरा नजीबंच ! रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या इ. स. १७५७ च्या उत्तरस्वारीतंच ही विषवल्ली खरंतर ठेचली जाणार होती; पण नजीबाने कसे डावपेच रचले पहा. १. १७५७ मध्ये नजीबाने मल्हारराव होळकरांस मोठी रक्कम दिली असा उल्लेख आहे  (झर-ए-खातिर-बतारिक-ए-रिश्वत).  मल्हाररावांनी त्याबदल्यात रघुनाथराव व इमाद-उल-मुल्क याजकडे नजीबासाठी रदबदली करावी असा नजीबाचा उद्देश होता.  संदर्भ - Marathas and Panipat - Hari Ram Gupta, page no. 110 (लेखकाने तारीख-ए-मुज्जफिरी, ले. १२६ हा मुळ संदर्भ जोडला आहे) २.  नजीबाने मल्हारराव होळकरांमार्फत राघोबाशी तह करण्याविषयीची कलमे कळवली. संदर्भ - मराठी रियासत खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५२४. प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. ७७ ३.  तारीख -ए-नजीबुद्दौल्लाह या नावाने इ. स. १७७३ मध्ये सय्यद नुरुद्दीन हुसेन याने लिहिले

इ. स. १७०२ साली महार व्यक्तीस दिलेला पाटीलकीचा महजर

लुबाडली गेलेली पाटीलकी महार व्यक्तीला परत दिल्याबाबतचे पत्र. मध्ययुगीन महाराष्ट्रात गावाच्या कारभारात, विशेषतः कर गोळा करणे व राखणदारी करणे यामध्ये पाटील, कारभारी, चौगुला आणि महार असा चार प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग असे. यापैकी कर गोळा करण्याचे काम पाटील करत असे. करांचा हिशोब ठेवण्याचे आणि इतर लिखापढीचे काम कुलकर्णी करत असे. चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करत असे आणि महार हा गावचा शिपाई आणि गावच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करत असे. गावच्या बाबतीत जी कामे पाटील आणि कुलकर्णी करत असत, तिच कामे परगण्याच्या बाबतीत अनुक्रमे देशमुख आणि देशपांडे करत असत. हे सर्व अधिकार वंशपरंपरागत चालत असत. हे अधिकार साधारणतः जातीनिहाय असत. कुलकर्णीपण ब्राह्मण किंवा प्रभू यांच्याकडे असे. महारांचे वतन शक्यतो महार जातीच्या व्यक्तीकडेच असत. मात्र चौगुला मराठा किंवा इतर जातीचाही असू शके. पाटील हा सामान्यतः मराठा जातीचा मात्र अनेकदा ब्राह्मण, धनगर, माळी, महार किंवा मुसलमान व्यक्तीलाही पाटीलकी दिल्याचे आढळते. [संदर्भ - श्री राजा शिवछत्रपती भाग १, ग. भा. मेहेंदळे - महाराष्ट्रातील गावांचा कारभार

पत्ररूप शंभूदर्शन

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी नऊ वर्षांची.. तीसुद्धा सतत युद्धमान; याकाळातले 'शंभूछत्रपती' खरोखरच जाणून घ्यायचे, तर त्यांची उपलब्ध पत्रे वाचण्याखेरीज पर्याय नाही. पुढील दोन पत्रे पाहिली; म्हणजे शंभूराजे युद्धाच्या काळातही प्रजाहित व धर्माबाबत कसे सदैव तत्पर होते. हे लक्षात येते. १. बापोली आणि सिडकोली या गावांना सिद्दी आणि पोर्तुगीजांनी उपद्रव दिला. रयत परगंदा होत आहे. तेव्हा त्याची चौकशी करावी. तसेच दादाजी कुलकर्णी यांचा शेतीचा भाग कारळे येथे होता. तो प्रजाभाग म्हणून खर्च केला म्हणून त्याने तक्रार केली. तेव्हा राजभाग वजा करुन उरलेला भाग त्यास परत द्यावा अशा राजाज्ञेचे पत्र आहे. श.१६०५ माघ वद्य १४ इ. स. १६८४ फेब्रु. ५                                 श्री   स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १० रुधिरोद्रारी नाम संवत्सरे माघ बहुल चतुर्दसी भोमवासरे राजश्री चिमणाजी आऊजी यांसि राजाज्ञा ऐसीजे कुदे बापोली हे दोन्हीं गाव व तिसरे मौजे सिडकोली मा। चेऊल तीन्ही गाव गनीम हबसी व फिरंगी यानी मारुन नेलें तेसमई रयेतीचा गळा कुळ लुटून नेळा याकरिता रयेती दिलगीर होऊन परागंदा होऊ पाहते

पेशव्यांचा थाट

पेशव्यांचा थाट 'पेशवाई थाट' हा आपल्याकडे अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग ! मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर फिरत होती. त्या लेखाची सत्यासत्यता ठाऊक नसली, तरी मराठ्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात लग्नावळीचे जेवण कसे होते, याची माहिती देणारा एक कागद प्रसिद्ध आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) ले. ३९७ अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणूका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत. यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा. १. जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे. २. गंध-अक्षत लावताना - वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक