Skip to main content

मल्हारराव होळकर आणि नजीबउद्दौलाह


उत्तरेत वारंवार अहमदशाह अब्दालीच्या आडून मराठ्यांस शह देणाऱ्या, अब्दालीच्या धार्मिक भावनेस हात घालून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या नजीबास मराठ्यांनीच एका कागदात 'खेळ्या' असे म्हटले आहे. पानिपतावरील रणसंग्रामास जबाबदार शकूनी खरा नजीबंच ! रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या इ. स. १७५७ च्या उत्तरस्वारीतंच ही विषवल्ली खरंतर ठेचली जाणार होती; पण नजीबाने कसे डावपेच रचले पहा.

१. १७५७ मध्ये नजीबाने मल्हारराव होळकरांस मोठी रक्कम दिली असा उल्लेख आहे (झर-ए-खातिर-बतारिक-ए-रिश्वत). मल्हाररावांनी त्याबदल्यात रघुनाथराव व इमाद-उल-मुल्क याजकडे नजीबासाठी रदबदली करावी असा नजीबाचा उद्देश होता. 
संदर्भ - Marathas and Panipat - Hari Ram Gupta, page no. 110
(लेखकाने तारीख-ए-मुज्जफिरी, ले. १२६ हा मुळ संदर्भ जोडला आहे)



२. नजीबाने मल्हारराव होळकरांमार्फत राघोबाशी तह करण्याविषयीची कलमे कळवली.
संदर्भ - मराठी रियासत खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५२४.
प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. ७७

३.  तारीख -ए-नजीबुद्दौल्लाह या नावाने इ. स. १७७३ मध्ये सय्यद नुरुद्दीन हुसेन याने लिहिलेल्या नजीबाच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद आहे.. एका प्रसंगी राघोबा फौज घेऊन नजीबावर हल्ला करणारंच होता, तेव्हा मल्हाररावांनी आपली फौज मध्ये आडवी घालून, "मला मारल्यावरंच आपण पुढे जाऊ शकता, मी तुम्हाला जाऊ देणार नाही" असे त्यात म्हटले आहे.
संदर्भ - An account of Najibuddaulah, english translation by Abdur Rashid, page no. 17


पुढे पानिपताच्या रणसंग्रामापुर्वी हाफीज रहमत खान या सरदारामार्फत अशी तोड ठरवली, की नजीबाचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेवून, अब्दालीस मार्गस्थ करावे. अशा आशयाचा करार पुर्वी १३ मार्च १७६० रोजी बेलभंडार गंगाजलपुर्वक झाला होता; पण भाऊसाहेब निघाल्याच्या वर्तमानाने धास्तावलेल्या नजीबाने छावणी उठवून निघालेल्या अब्दालीस गळ घालून थांबवले आणि करार तेव्हाच फसला होता. यावेळेस हा करार मल्हारराव होळकर यांनाच पसंत न पडल्याचे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे.
संदर्भ - मराठी रियासत, खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५७६.
प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. २४

© डॉ. सागर पाध्ये

संदर्भग्रंथ -
१. मराठी रियासत- गो. स. सरदेसाई
2. Marathas and Panipat - Hari Ram Gupta
3. Solstice at Panipat - Uday S Kulkarni
4. An Account of Najibuddaulah - English translation by Abdur Rashid


Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज