Skip to main content

इ. स. १७०२ साली महार व्यक्तीस दिलेला पाटीलकीचा महजर

लुबाडली गेलेली पाटीलकी महार व्यक्तीला परत दिल्याबाबतचे पत्र.

मध्ययुगीन महाराष्ट्रात गावाच्या कारभारात, विशेषतः कर गोळा करणे व राखणदारी करणे यामध्ये पाटील, कारभारी, चौगुला आणि महार असा चार प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग असे.

यापैकी कर गोळा करण्याचे काम पाटील करत असे. करांचा हिशोब ठेवण्याचे आणि इतर लिखापढीचे काम कुलकर्णी करत असे. चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करत असे आणि महार हा गावचा शिपाई आणि गावच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करत असे. गावच्या बाबतीत जी कामे पाटील आणि कुलकर्णी करत असत, तिच कामे परगण्याच्या बाबतीत अनुक्रमे देशमुख आणि देशपांडे करत असत. हे सर्व अधिकार वंशपरंपरागत चालत असत.

हे अधिकार साधारणतः जातीनिहाय असत. कुलकर्णीपण ब्राह्मण किंवा प्रभू यांच्याकडे असे. महारांचे वतन शक्यतो महार जातीच्या व्यक्तीकडेच असत. मात्र चौगुला मराठा किंवा इतर जातीचाही असू शके. पाटील हा सामान्यतः मराठा जातीचा मात्र अनेकदा ब्राह्मण, धनगर, माळी, महार किंवा मुसलमान व्यक्तीलाही पाटीलकी दिल्याचे आढळते.
[संदर्भ - श्री राजा शिवछत्रपती भाग १, ग. भा. मेहेंदळे - महाराष्ट्रातील गावांचा कारभार - पृ. क्र. ३१०]

सदर पत्रप्रकार हा महजर म्हणून ओळखला जातो. अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत,त्यांना साक्ष ठेवून हा कागद केला जात असे. यात उपस्थित राहण्यासाठी व्यक्तींवर जाती-धर्माचे बंधन नसे. मातब्बर व्यक्तीचे नाव सर्वात आधी स्वतंत्र लिहिले जाई. देशमुख वा पाटलांच्या नावाखाली 'नांगरा'ची निशाणी केलेली असे. इतर गावकामगारांच्या नावाखाली किंवा नावापुढे ज्याच्या त्याच्या व्यवसायाची खूण (निशाणी) म्हणून छोटे चिन्ह काढत.
[ लेखनप्रशस्ती - डॉ. अनुराधा कुलकर्णी, पृ. क्र. १]


या पत्रात एका महार व्यक्तीच्या पाटीलकीचा निवाडा झाला आहे. गुरव धांडेघरकर व गुरव गोडोलीकर यांनी ते पाटीलकीचे वतन लुबाडले. मोकदमाच्या साक्षीवरून पाटीलकीचे वतन 'शेटी बिन नागनाक महार' याचे असल्याचे सिद्ध होताच त्याच्या नावाने पुन्हा करून दिले.
[संदर्भ - सनदापत्रांतील माहिती , संपादक - गणेश चिमणाजी वाड; प्रकरण - ५,ले. ३४, पृ. क्र. १३४]

शब्दार्थ -
वतन/मिरास- वंशपरंपरागत अधिकार
लाजिम - कर, हक्क
पासोडी - पाटलाला सारा माफ केलेली जमिन

डॉ. सागर पाध्ये

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज