इतिहासाचा अभ्यास का करायचा ? या नेहमीच्या प्रश्नाला माझं एकंच उत्तर कायम असतं, 'राष्ट्रपुरुषांकडून 'राष्ट्रीय चारित्र्य' शिकण्यासाठी !' आपल्या पुर्वजांचे कर्तृत्व, संस्कार यांची जाण असली, म्हणजे नकळत आपलीही पाऊले त्या मार्गावर पडत राहतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पत्र प्रसिद्ध आहे.आपल्या छावणीच्या अधिकाऱ्यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरून वर्तणूक करणे. कोण्ही रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही." (ले. २८)
आता थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील असेच एक पत्र पहा; सदर पत्र पेशवे दप्तर खंड १५, लेखांक ४६ असे प्रसिद्ध झाले आहे. अंताजी माणकेश्वर या पेशव्यांच्या सरदाराने चिमाजी आप्पांना लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात एका ठिकाणी अंताजी म्हणतात, "वरचेवर श्रीमंतांची पत्रे येविसी येतात की काडीचा उपद्रव रयेतीस न देणे."
कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !
©डॉ. सागर पाध्ये.
Comments
Post a Comment