Skip to main content

... राजा कालस्य कारणम् ।। (पत्रांतील शिवकालीन कथा)


ही गोष्ट आहे शिवकाळातील कोंढवे गावच्या एका तरुणाची, त्याचं नाव 'येसाजी पाटील कामथे'. त्याचे पुर्वज एका मुसलमानाच्या वतीने गावच्या मोकदमीचा कारभार पहात असत. पुर्वी हिशेबात काही गडबड झाल्याच्या कारणाने येसाजीच्या मोठ्या भावाला सिंहगडावर नेऊन त्याचे डोके मारले होते. मात्र एक दिवस अवचित येसाजीला शिवछत्रपतींसाठी एक काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचे येसाजीने सोने केले...

शिवचरित्र साहित्य खंड दोन, लेखांक १०५ मधील एका पत्रात ही गोष्ट आली आहे. पुर्वी दौलतशाह नावाच्या कोणा मुसलमान व्यक्तीकडे असलेले इनाम, त्याला मुलगा नसल्याने त्याची मुलगी रतनमा हिच्याकडे आले होते. त्याचा कारभार मात्र बाळोजी, हरजी व जाव पाटील पाहत असत. पुढे दादाजी कोंडदेवाच्या काळात सिंहगडावर नेऊन कुलकर्णीपण पाहणारा बावाजी पाटील व इतर कारभाऱ्यांची डोकी मारली गेली. त्या बावाजी पाटलाचा धाकटा भाऊ येसाजी पाटील !

एक दिवस शिवछत्रपती शिवापुरास आले आणि महाराजांनी शिवापुरात बाग आमराइसाठी धरण बांधण्याचा हुकुम सोडला. राजाचं काम म्हणून लोक लगबगीने कामास लागले; पण या कामात एक निराळाच अडथळा निर्माण झाला. वाटेतंच एक भला मोठा धोंडा होता, त्याने धरणाचे पाणी अडवून धरले, प्रवाह पुढे जाईना. महाराजांची आज्ञा झाली, "आम्हीं स्वारीहून येतो, तो पावेतो हर इलाज करून एवढा धोंडा फोडून पाण्यास वाट करणे." आणि महाराज खरंच जेव्हा स्वारीहून परत आले, तो काय आश्चर्य ? खरंच कोणीतरी तो धोंडा फोडून पाण्यास सुरळीत वाट करून दिली होती. "ही कर्तबगारी कोणाची ?" असे विचारताच लोकांनी येसाजी पाटलाचे नाव राजांना सांगितले.

खुश होऊन महाराजांनी येसाजीला बक्षिस द्यायचे ठरवले. त्यावर येसाजीने दिलेले उत्तर अगदीच लक्षात राहण्यासारखे आहे. 'काही रोख रक्कम दिली तर आज-उद्या संपेल. त्यापेक्षा पुर्वी माझ्या वडीलबंधूस (बावाजी पाटील) काही कामकाजानिमित्त सिंहगडास नेऊन, तिथे देडदंड झाला, तेव्हा आता महाराजांनी कृपावंत होऊन कोंढवे गावची पाटीलकीच आमचे नावे करून द्यावी,' अशी अर्जदास्त येसाजीने महाराजांसमोर पेश केली.

महाराजांनीही मागितलेली बक्षिसी येसाजीस सन्मानपुर्वक बहाल केली. येसाजीच्या दिवंगत भावाच्या मुलाच्या नावे इनाम करण्यात आले.

      [ शिवचरित्र साहित्य खंडात प्रसिद्ध झालेले पत्र - १/२]
       
          ( २/२)

राज्यकर्ता सक्षम असला म्हणजे, म्हणजे प्रजेत सुरक्षिततेची भावना आपोआप निर्माण होते आणि सामाजिक जीवनात स्थैर्य आले, म्हणजे देशातील नागरिकांच्या कर्तृत्वास आपोआप चालना मिळते. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून शिवकाळातील ही एक कथा सागंता येते.

महाभारतात शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांनी युधिष्ठीराला केलेला उपदेश आठवतो का ?

कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् ।
इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम् ।।

[(हे युधिष्ठीरा), काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तूं संशयांत पडू नको. कारण की, राजा हाच काळाचे कारण आहे.]

धन्यवाद !

©डॉ. सागर पाध्ये

(सदर पत्र हे १७८९-९० सालचे, म्हणजे शिवछत्रपतींच्या पश्चात सुमारे एकशे दहा वर्षांनी लिहिलेले आहे. जमिनीच्या वादात एका पक्षाने आपल्या पुर्वजांची ही कहाणी सांगितली आहे.)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज